16.4 C
New York
Tuesday, May 13, 2025

Buy now

spot_img

आष्टी मतदार संघातील भ्रष्टाचार, आणि दहशतीला जनता वैतागली ; परिवर्तन घडविण्यासाठी जनतेने साथ द्यावी -ॲड. नरसिंह जाधव 

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

पाटोदा | प्रतिनिधी

 

आतापर्यंत निवडून दिलेल्या प्रस्थापित पुढाऱ्यांनी केवळ आपला आणि आपल्या बगलबच्च्याचा विकास करून सर्व सामान्य जनतेला मूलभूत सुविधापासून दूर ठेवन्याचे पाप केले आहे. मतदार संघाच्या विकासासाठी एकही मोठा प्रकल्प आणलेला नाही. आहे ते कारखाने बंद पडला आहे. शासकीय योजनासाठी पाणी पुरवठा योजना, असेल, महामार्ग, गावातील रस्ते, नाल्या यासाठी सरकारकडून कोट्यवधीचा निधी मंजूर होऊन येतो मात्र या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या बगलबच्चे थातूरमातूर कामे करून आलेला निधी आपल्याच घश्यात घालतात आणि झालेल्या कामाची वर्ष सहा महिन्यात वाट लागते. पुन्हा याविरुद्ध कुणी आवाज उठविला तर हेच निवडून दिलेले लोकप्रतिनिधी या भ्रष्टाचारी कार्यकर्त्यांची पाठराखण करतात. याच पैसा आणि सत्तेच्या माध्यमातून मतदार संघात भ्रष्टाचार, गुंडगिरी, आणि दहशतीचे वातावरण निर्माण करून राजकारण केलं जातं. कुणाच्या मोक्याच्या जागा बघून दाब दडपशाही करून थोड्याफार पैश्यात ताब्यात घ्यायच्या किंवा सार्वजनिक मालमत्ता असेल तर सत्तेचा गैरवापर करून ताबे मिळवायचे असे प्रकार केले जातात अशा या दहशत आणि भ्रष्टाचार, आणि गुंडगिरीला जनता वैतागली आहे. हे सर्व थांबविण्यासाठी आपण शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणुक लढविण्याची तयारी केली असून आता जनतेने साथ द्यावी असे आवाहन ॲड. नरसिंह जाधव यांनी केले आहे.

 

 

शरद पवारांचे कट्टर समर्थक म्हणून बीड जिल्ह्यात ओळख असलेले पाटोदा पंचायत समितीचे सभापती राहिलेले स्व. ॲड. लक्ष्मणराव जाधव यांचे सुपुत्र आणि उच्च न्यायालयातील ॲड. नरसिंह जाधव हे शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून, त्यांनी गेल्या वर्षभरापासून मतदार संघातील गावागावांमध्ये दौरे सुरू केले आहेत. जवळपास दोनशे गावांना भेटी देऊन सर्व सामान्य नागरिकांशी संवाद साधला आहे. फक्त शरद पवाराचे एकनिष्ठ कार्यकर्ता हीच ओळख असलेल्या ॲड. नरसिंह जाधवाच्या उमेदवारीला आष्टी मतदार संघातून उस्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

 

 

जनहित याचिकाच्या माध्यमातुन न्याय 

यावेळी लोकांशी चर्चा करताना ॲड. नरसिंह जाधव यांनी सांगितले की, आज आष्टी मतदार संघात आतापर्यंतच्या नेतृत्वाने केवळ आपले आणि आपल्या बगल बच्याचे घरे भरुन सर्व सामान्य जनतेची पिळवणूक केली आहे. आज मतदार संघात भ्रष्टाचार आणि दहशतीचे वातावरण आहे. शासकीय योजना मंजूर करून आणायच्या आणि कागदोपत्री योजना राबवून शासकिय पैसा आपल्या खिशात घालायचं हेच धोरण राबविले जात आहे. या विरोधात कुणी आवाज उठविला तर त्याला दाबण्यसाठी जोर जबरदस्ती करून आवाज दाबला जातो. मात्र आपण या विरोधात आवाज उठविला. शासकीय योजनामधील भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका दाखल करण्यात येऊन भ्रष्टाचार रोखण्यासाठी प्रयत्न केले असल्याचे सांगून ही भ्रष्ट, दहशत संपविण्यासाठी आपण निवडणूक लढवीत असून, सर्व सामान्य जनतेची वकिली करण्यासाठीं जनतेच्या न्यायालयात उतरलो असल्याचे ॲड. जाधव यांनी सांगितले.

 

 

आष्टी मतदार संघात शरद पवारांच्या नेतृत्वखाली सिंचन, प्रकल्प, नवीन उद्योग सुरू करण्यासाठी पुढाकार घेण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगून प्रस्थापित पुढाऱ्यांच्या विरोधात जनतेतून नाराजी असल्यामुळे येणाऱ्या निवडणूकीत नवा चेहरा म्हणून जनता या वेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा उमेदवार निवडून देईल अशी अपेक्षा ऍड नरसिंह जाधव यांनी व्यक्त केली आहे.

ads

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles