Home ताज्या बातम्या जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल 5 डिसेंबरपासून वाजणार

जिल्हा परिषद,पंचायत समिती निवडणुकीचा बिगुल 5 डिसेंबरपासून वाजणार

0

मुंबई |

 

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची प्रक्रिया आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहे. दरम्यान, आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका कधी होणार याबाबत चर्चा सुरु झाली आहे. राज्यात अनेक ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची खुर्ची रिकामी होती. ही परिस्थिती लक्षात घेऊन राज्य निवडणूक आयोगाने त्वरित ही पदे भरण्याची मागणी सरकारकडे केली होती. आयोगाच्या विनंतीनंतर, नोव्हेंबर 7 तारखेला 112 तहसीलदारांना पदोन्नती देऊन त्यांना उपजिल्हाधिकारी बनवण्याचे आदेश जारी केले. या बदलामुळे आता निवडणुकीची प्रक्रिया पुढे सरकण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

 

पदोन्नती मिळालेले हे सर्व अधिकारी लवकरच त्यांचा पदभार स्वीकारणार आहेत. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लवकरच होण्याची दाट शक्यता आहे. अधिकारी नसल्यामुळे आयोगाला निवडणूक कार्यक्रम जाहीर करणे शक्य नव्हते, त्यामुळे प्रक्रिया मंदावली होती.

 

दरम्यान, नगर परिषद निवडणुकांचा निकाल जाहीर होताच, राज्यातील 32 जिल्हा परिषद आणि 331 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा रणधुमाळी सुरू होईल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या प्रलंबित निवडणुकांचा मार्ग आता मोकळा झाला असून जिल्हा परिषद निवडणुकीचा बिगुल 5 डिसेंबरपासून वाजण्याची शक्यता आहे.

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version