महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने मंगळवारी (ता. ३) ‘टीईटी’चा (शिक्षक पात्रता परीक्षा) निकाल जाहीर केला. त्यात चार लाख ४६ हजार ७३० पैकी अवघे ११.२८ टक्केच (५० हजार ३६९) भावी शिक्षक उत्तीर्ण झाले आहेत.या परीक्षेत तब्बल तीन लाख ९६ हजार ३२५ परीक्षार्थी नापास झाले आहेत.
सर्वोच्च न्यायालयाने १ सप्टेंबर २०२५ रोजी निकाल दिला आणि महाराष्ट्रातील इयत्ता पहिली ते आठवीच्या वर्गांवरील दीड लाखांहून अधिक शिक्षकांची झोप उडाली. सर्वोच्च न्यायालयाने निर्णयाचा पुनर्विचार करावा, यासाठी राज्यातील शिक्षक संघटनांनी राज्य सरकारकडे मागणी केली. आंदोलने देखील केली. पण, राज्य सरकारला तशी याचिका दाखल करण्याचा अधिकार नसल्याची बाब समोर आली. आता शिक्षकांना केंद्र सरकारच्या माध्यमातून काहीतरी सकारात्मक निर्णयाची अपेक्षा आहे.
मात्र, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या शिक्षकांचे वय सध्या ५३ वर्षांपर्यंत आहे, त्यांना देखील टीईटी द्यावी लागणार आहे. विशेष म्हणजे दोन वर्षांच्या मुदतीत ‘टीईटी’ उत्तीर्ण न होणाऱ्या शिक्षकांवर सक्तीच्या सेवानिवृत्तीची कारवाई होणार आहे. त्यामुळे २३ नोव्हेंबर २०२५ रोजी झालेल्या ‘टीईटी’साठी राज्यभरातील ५० हजारांहून अधिक शिक्षक देखील बसले होते. त्यातील अनेकांना अपयश आले आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेली मुदत ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत आहे. या दरम्यान केंद्र व राज्याच्या आणखी चार ‘टीईटी’ होतील. या परीक्षांमध्ये संबंधित शिक्षकांना उत्तीर्ण व्हावेच लागणार आहे.
‘टीईटी’चा निकाल असा…
(पेपर एक)
एकूण परीक्षार्थी
१,९०,९०१
उत्तीर्ण परीक्षार्थी
२१,८९२
अनुत्तीर्ण परीक्षार्थी
१,६८,९९३
——————
(पेपर दोन)
एकूण परीक्षार्थी
२,५५,८२९
उत्तीर्ण परीक्षार्थी
२८,४७७
अनुत्तीर्ण परीक्षार्थी
२,२७,३३
पेपर एक
विषयनिहाय निकालाची टक्केवारी
माध्यम परीक्षार्थी उत्तीर्ण टक्केवारी
मराठी १,३४,६८० १२.०२
इंग्रजी ६,६३७ ५.४४
उर्दु १३,६६८ ६.९६
हिंदी ३५,०९० १२.१९
बंगाली ९६ ७.२९
कन्नड ६९३ १५.०१
तेलगू १० १०.००
गुजराती २७ ३.
पेपर दोन (गणित व विज्ञान)
विषयनिहाय निकालाची टक्केवारी
मराठी ६०,९४१ ८.२९
इंग्रजी १३,९२४ ५.८७
उर्दु ४,८४६ ३.३४
हिंदी १५,७६९ १७.००
बंगाली १८ २२.२२
कन्नड २६३ ७.९८
तेलगू ३ ००.००
गुजराती १८ ००.००
——————————-
पेपर दोन (सामाजिकशास्त्र)
विषयनिहाय निकालाची टक्केवारी
मराठी १,१०९८७ ९.८१
इंग्रजी ५४२३ ६.२०
उर्दु ६०४३ ३.३३
हिंदी ३७,११६ २२.२९
बंगाली ४२ ११.९०
कन्नड ४१६ ८.४१
गुजराती १७ ५.८८
३६ उमेदवारांचा निकाल राखून ठेवला
‘टीईटी’त गुण वाढवून देऊन पास करण्यासंदर्भातील ऑडिओ क्लिक व्हायरल झाली होती. या प्रकरणात पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी मुरगुड (जि. कोल्हापूर) पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिस या प्रकरणाची सखोल तपास करीत आहेत. त्यामळे या प्रकरणातील ३६ संशयित उमेदवारांचे निकाल महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने राखून ठेवले आहेत. त्यात पेपर एकमधील १६ आणि पेपर दोनचे २० उमेदवार आहेत. दुसरीकडे या परीक्षेत एक प्रश्नाच्या उत्तराबद्दल अनेक उमेदवारांनी आक्षेप घेतला असून त्यासंदर्भातील निर्णय काही दिवसांत होणार आहे.


