गणपतीनंतर ‘सोनपावलांनी, वाजतगाजत गौरींचे आगमन होते. भाद्रपद शुद्ध सप्तमीला गौरी आवाहन केले जाते. यंदा गुरूवारीच गौरींचे आगमन होत आहे. ज्यांच्या घरी गौरी असतात, त्यांच्याकडे जय्यत तयारी केली जाते.
घरातील महिला नटूनथटून गौरींना आवाहन करतात. महाराष्ट्रात बहुतांश कुटुंबांमध्ये गौरी पूजा केली जाते.
यंदा गौरी आवाहनाचा मुहूर्त सायंकाळी चार ते सहा (सूर्यास्तापूर्वी) असा आहे. ज्येष्ठा आणि कनिष्ठा अशा या दोघी बहिणींचे घरातील “लक्ष्मी’च्या हस्ते आगमन झाल्यानंतर शुक्रवारी गौरींचे पूजन, आरास अशी प्रथा आहे.
या दिवशी सुहासिनी भोजन आणि गौरींचे पूजन आणि भोजन अशी प्रथा आहे. शनिवारी सायंकाळी सात वाजण्यापूर्वी गौरींच्या विसर्जनाचा मुहूर्त आहे.