13.7 C
New York
Sunday, October 6, 2024

Buy now

spot_img

40 आमदार म्हणजे पक्ष नाही; कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार करावा लागतो; तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं लागेल हाच पर्याय -जितेंद्र आव्हाड

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

मुंबई |

अजित पवार यांची पत्रकार परिषद झानंतर जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषेद घेतली. अजित पवार यांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का ? असा सवाल त्यांनी केला. तसेच शरद पवार यांना तुम्ही राष्ट्रीय अध्यक्ष मानता, मग त्यांनी घेतलेले निर्णय तुम्हाला मान्य आहे का? असा सवालही जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केला. शरद पवार यांना तुम्ही अध्यक्ष मानता.. मग त्यांनी सुनील तटकरे आणि प्रफुल पटेल यांच्यावर केलेली कारवाई मान्य करणार का असा प्रश्नही त्यांनी केला. शरद पवार राष्ट्रीय अध्यक्ष आहेत. त्यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केली आहे, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले. त्यामुळे हीच नियुक्तीच योग्य असल्याचे त्यांनी सांगितले.

 

अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या कायदेशीर आहेत का? अजित पवारांनी केलेल्या नियुक्त्या घटनात्मक आहेत का ? शरद पवार अध्यक्ष आहेत, मग यांच्या नियुक्त्या घटनात्मक कशा? त्यांना पक्षाची मान्यता नाही, त्यांना नियुक्त्या करण्याचा अधिकार नाही. सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांना निलंबित केले आहे. त्यांना कोणतेच अधिकार नाहीत. अजित पवारांची पत्रकार परिषद किटी पार्टी होती, असा टोलाही आव्हाड यांनी लगावला.

काही वेळापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस वतीने पत्रकार परिषद काही जणांनी घेतली. त्या पत्रकार परिषदेमध्ये विविध पदे वाटण्यात आली, त्यांना संविधानिक मान्यता नाही. एकच राष्ट्रवादी पक्ष आहे, त्यांचे अध्यक्ष शरद पवार आहेत…ते सुद्धा मान्य करताय. पार्टी अध्यक्षाचे अधिकार काय आहेत ?? शरद पवारांनी प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांना निलंबित करण्यात आले आहे, असे आव्हाड म्हणाले.

पक्षाध्यक्षाला लपवून तुम्ही पक्ष विरोधी कारवाया करण्यासाठी प्रवृत्त केले, त्यामुळे त्यांना दोघांना निलंबित केलं आहे. तिथे सगळे नेते म्हणतात अध्यक्ष शरद पवार आहेत. मग प्रश्न उरतो नैतिकतेचा ? मग तुम्ही प्रफुल्ल पटेल यांनी सुनील तटकरे वर केलेली कारवाई मानता की नाही ? शरद पवार जयंत पाटील म्हणाले यामध्ये कायदेशीर कारवाई केली पाहिजे. कायद्याच्या अज्ञानापोटी केलेल्या नियुक्त्याना मान्यता मिळत नाही, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.

 

मुख्य प्रतोद व्हीप निवडण्याचा अधिकार हा फक्त पक्ष अध्यक्षांना आहे. विधानसभा एक गट बाहेर जातो आणि पक्ष म्हणतो त्याला तसा अधिकार नाही. ज्या पक्ष्याच्या नावाने फॉर्म भरला आहे आणि नंतर म्हणाल तुमचा काही संबंध नाही, असं होणार नाही..तुम्हाला दुसऱ्या पक्षात जावं लागेल हाच पर्याय राहील तुमच्याकडे कितीही संख्या असेल. 40 आमदारांच्या नावाने तुम्ही पक्ष म्हणू शकत नाही..कार्यकर्ते पदाधिकारी यांचा विचार करावा लागतो. पक्ष संविधानाने चालतो, आणि तो पक्ष शरद पवार यांच्याकडे आहे, असेही आव्हाड यांनी स्पष्ट केले.

 

एक गटाला बाहेर पडून स्वत:ला पक्ष म्हणण्याचा अधिकार नाही. तुमची संख्या कितीही असो पण तुम्हाला पक्ष म्हणून मान्यता देता येणार नाही. माझी निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली त्यामुळे तो निर्णय योग्य आहे. सुभाष देसाई आणि राज्यपाल यांच्या पाच याचिका दाखल झाल्या होत्या. त्यावेळी निकालात फक्त पार्टीचा अध्यक्ष प्रतोद नेमू शकतो असे न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी म्हटले आहे. त्याच आधारे माझी निवड राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी केली आहे. त्यामळे माझी निवड योग्य आहे असे आव्हाड यांनी स्पष्ट केले. व्हीपचा अधिकार हा पक्षाला आहे. शरद पवार यांनी जयंत पाटील यांची नियुक्ती केलेली तुम्ही रद्द कशी करू शकता? असा सवाल जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. करण त्यांना संविधानिक नियुक्त्या करण्याचा अधिकार नसल्याचं आव्हाड म्हणाले.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles