17.3 C
New York
Monday, October 7, 2024

Buy now

spot_img

कांद्याला भाव मिळेना; तरुण शेतकऱ्याची आत्महत्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

बीड |

मोठ्या कष्टाने शेतात पिकविलेल्या कांद्याला बाजारात भाव मिळत नसल्याने, शेतीसाठी घेतलेलं कर्ज कसे फेडावे या काळजीने २५ वर्षीय तरुण शेतकऱ्याने झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बीड तालुक्यातील बोरखेड येथे घडली आहे.

बीड तालुक्यातील बोरखेड येथील शेतकरी संभाजी अर्जुन अष्टेकर (वय 25 वर्ष ) यांना पाच एकर जमीन असून, त्यानी आपल्या दीड दोन एकर शेतात कांद्याचे पीक घेतले होते. आपल्या शेतात पिकविलेल्या कांदा पिकाला यंदा बाजारात भाव नसल्याकारणाने , आता आपण घेतलले कर्ज कसे फेडणार या काळजीने शेतात आंब्याच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

 

संभाजी कुटुंबातील एकमेव कर्ताधर्ता असुन वयोवृद्ध वडील अर्जुन लक्ष्मण अष्टेकर वय ६५ वर्षे आई वनमाला वय ६० वर्षें,मोठा भाऊ शिवाजी वय ३० वर्षं परंतु भोळसर, मोठी बहीण सोनाली अंबादास वनकुदरे मुलगा मंदार वय ९ वर्षे भोळसर असुन,मुलगी ऋतुजा वय ७ वर्षे यांची जबाबदारी संभाजी यांच्यावर होती. ५ एकर जमिनीत ३ एकर कांदा लावण्यात आला होता. मात्र कांद्याला बाजारात भाव नसल्यामुळे संभाजी चिंतेत असल्याचे त्याचे वडील अर्जुन अष्टेकर यांनी सांगितले, जवळपास साडे ३ लाख रूपये कर्ज असल्याचे त्यांनी सांगितले.

या प्रकरणी मंगळवारी सकाळी लिंबागणेश पोलिस स्टेशनचे जमादार सचिन डिडूळ यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला.तलाठी बाळासाहेब वनवे दुपारी १ वाजता घरी भेट देऊन गेले. लिंबागणेश प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदन करण्यात आले.दुपारी सव्वा ३ वाजता अंत्यसंस्कार करण्यात आले.

सरकारचे धोरण हेच शेतकऱ्यांचे मरण  -डॉ.गणेश ढवळे
नापिकी तसेच अतिवृष्टी आदी अस्मानी संकटांनी शेतकरी आर्थिक संकटात सापडलेला असतानाच सुलतानी संकटाची त्यात भर पडली असून कांद्याला हमीभाव न देणे हे सरकारचे धोरण शेतक-यांचे मरण होऊन बसले आहे.कांद्याला हमीभाव मिळावा यासाठी दि.६ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले होते.ही आत्महत्या नसून सरकारी व्यवस्थेने केलेला खुनच आहे.
-डॉ.गणेश ढवळे लिंबागणेशकर

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles