23.3 C
New York
Saturday, October 5, 2024

Buy now

spot_img

डॉक्टरची 57 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक; बिहारच्या पाच आरोपींना बेड्या ठोकल्या

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

सायबर गुन्ह्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालल्याचं दिसत आहे. यामध्ये अमिषाला बळी पडणाऱ्यांची संख्या ही जास्त असल्याचे समोर आले आहे. आता बीडमधून अशीच एक घटना समोर आली आहे. बीडमधील एका डॉक्टरला चांगल्या परताव्याचं आमिष दाखवत लाखो रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी बीड जिल्ह्याच्या सायबर पोलिसांनी बिहारच्या पाच आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

फॉरेक्स मार्केटमध्ये गुंतवणूक करून त्यात जास्त नफा देण्याचे आमिष दाखवून बीडमधील केसोना ॲक्सिडेंट हॉस्पिटलचे डॉ. विठ्ठल सोनाजीराव क्षीरसागर यांची फसवणूक केली. डॉ. विठ्ठल क्षीरसागर यांची 57 लाख 20 हजार रुपयांची ऑनलाईन फसवणूक झाली. याप्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात 5 जानेवारी रोजी गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणात सायबर पोलिसांनी तपास करून बिहारमधील पाच भामट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

डॉ. विठ्ठल क्षीरसागर हे नोव्हेंबर महिन्यात सोशल मार्केटिंग साईट पाहत होते. यातील एका साईटवर त्यांनी रिप्लाय दिला. त्यावरून त्यांना टेलीग्राम आयडी देऊन त्यावर बोलण्यास सांगितले. पाच ते सात दिवस समोरील व्यक्ती अर्पिता मोनिका (रा. बंगळुरू) हिच्याशी मेसेजवर बोलणे झाले. यावेळी तिने आपण फॉरेक्स ट्रेडिंगसाठी इच्छुक आहात का? असा सवाल केला. यावर डॉ. क्षीरसागर यांनी होकार दिला. त्यानंतर एक लिंक पाठवून त्यात सर्व वैयक्तिक माहिती भरली.

10 नोव्हेंबर रोजी क्षीरसागर यांनी 40 हजार रूपये गुंतवणूक केली. त्याचे 15 नोव्हेंबरला 45 हजार 200 रूपये नफा स्वरूपात मिळाले. त्यामुळे यांचा विश्वास बसला. त्यानंतर वेगवेगळ्या दिवशी आणखी पैसे गुंतवणूक करण्यास सांगितले. 57 लाख 20 हजार रूपये गुंतवणूक झाल्यावर 4 डिसेंबर 2023 रोजी त्यांना गुंतवणूक केलेल्या नफ्यावर तुम्हाला 36 लाख रूपये टॅक्स बसला आहे. तो भरा, असे सांगितले. परंतु डॉ. क्षीरसागर यांनी हे पैसे मिळणाऱ्या नफा रकमेतून कपात करा आणि बाकीचे पैसे परत करा, असा आग्रह धरला.

त्यानंतर त्यांनी वारंवार मेसेज केले, परंतु त्यावर काहीच प्रतिसाद मिळाला नाही. यावरून त्यांना आपली फसवणूक झाल्याचे समजले. त्यानंतर डॉक्टर क्षीरसागर यांनी 5 जानेवारी 2024 रोजी तत्काळ सायबर पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल झाला होता. त्यानंतर सायबर पोलिसांनी तपासाला सुरूवात केली. हे भामटे बिहारमधील असल्याचे समजले.

पोलिसांनी बिहारमध्ये जावून पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास गात, उपनिरीक्षक शैलेष जोगदंड, रामदास गिरी, विजय घोडके, प्रदीप वायभट, अजय जाधव यांच्यासह सायबर टीमने केली असल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

संबधित बातम्या

- Advertisement -

Latest Articles