आष्टी | प्रतिनिधी
दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. राज्यातील सहकारी दूध संघांमार्फत संकलित होणाच्या गाईच्या दूधासाठी दूध उत्पादकास प्रतिलिटर ५ अनुदान) देण्यात येणार असल्याची घोषणा राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केली. ही योजना राज्यातील फक्त सहकारी दूध उत्पादक संस्थांमार्फत येणार असल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, यासाठी सहकारी दूध संघाने दूध उत्पादक शेतकऱ्यांना ३.२ फॅट आणि ८.३ता प्रति लिटर योजना १ जानेवारी २०२४ ते दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू किमान २९ रुपये दूध दर शेतकयांच्या बँक खात्यावर रोख जमा करण बंधनकारक आहे. त्यानंतर शेतकऱ्यांना शासनामार्फत ५ रुपये प्रति लिटर बँक खात्यावर वर्ग करण्यात येतील असे विखे पाटील म्हणाले. याबाबत विधान परिषदेचे आमदार सुरेश पस यांनी अधिवेशनात उत्पादकांना वाढीव भाव देण्याबाबत प्रश्न मांडला होता तसेच मंत्रिमंडळाची विशेष बैठक घेऊन दुधाबाबत निर्णय घ्या असेही मागणी देखील आ.धस यांनी प्रथम केली होती या मागणीला यश आले आहे.दूर उत्पादकांच्या व्यथा शासनाकडे प्रभावी मांडल्यामुळे पाच रुपये अनुदान घोषित …
आ.सुरेश धस ठरले तारणहार आहेत.
दूधउत्पादक शेतकरी केलेल्या मागणीला यश आले असून आपण नागपूर येथे सुरू असलेल्या अधिवेशन काळात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, दुग्ध विकास मंत्री राधकृष्ण विखे पाटील यांच्याकडे याबाबत वेळोवेळी पाठपुरावा केला होता. त्यावर आता राज्यसरकारने सकारात्मक निर्णय घेऊन शेतकरी वर्गाला दिलासा दिल्याबद्दल सरकारचे मनःपूर्वक आभार विधान परिषदेचे आ.सुरेश धस यांनी मानले.
दरम्यान, डीबीटी (उद्दढ) करण्यासाठी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे बँक खातं हे त्याच्या आधार कार्डशी आणि पशुधनाच्या आधारकार्डशी लिंक असणे आवश्यक आहे. त्याची पडताळणी करणं आवश्यक राहील. ही योजना दिनांक १ जानेवारी २०२४ ते दिनांक २९ फेब्रुवारी २०२४ या कालावधीसाठी लागू राहणार आहे. त्यानंतर आवश्यकतेनुसार आढावा घेवून मुदतवाढ देण्याबाबत निर्णय घेण्यात ही योजना आयुक्त (दुग्धव्यवसाय विकास) यांच्या मार्फत राबविली जाणार आहे. याबाबतीत शासन निर्णय लवकरच निर्गमित करण्यात येणार आहे.
दूध उत्पादक शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्याचा सरकारचा प्रयत्न दुध आणि दुग्धजन्य पदार्थाचे भाव हे प्रामुख्याने मागणी व पुरवठा आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील दुध भुकटी व बटरचे दर यावर अवलंबून असतात. त्यानुसार आंतरराष्ट्रीय बाजारात दूध भुकटी व बटरचे दर कमी झाल्यास दुधाचे दर कमी होतात. याशिवाय, दुधाच्या पुष्ट काळातही दुधाचे दर कोसळतात, ही वस्तुस्थिती आल्याचे विखे पाटील म्हणाले. दरम्यान, असे असुनही राज्यातील दूध उत्पादक निर्णय घेतला आहे.
शेतकऱ्यांचे आर्थिक हित जोपासण्यासाठी शासन विशेष परिस्थितीत बाजारात उचित हस्तक्षेप करत आहे. दुध उत्पादक शेतकऱ्यांना योग्य न्याय देण्याचा प्रयत्न करत आहोत. त्यानुषंगाने शासनाने यापूर्वी राज्यातील अतिरीक्त दुधाचे नियोजन करण्यासाठी अनुदान योजना राबविली होती. त्यानुसार शासनाने शेतकऱ्यांचे अतिरीक्त दूध स्वीकारून त्याचे दुध भुकटी व बटरमध्ये रूपांतरण करून अतिरीक्त दुधाचा प्रश्न मार्गी लावला होता आताही सरकारने दूध उत्पादक शेतकन्यांना ५ रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेतला असून या साठी विधानपरिषदेचे आमदार सुरेश धस यांनी वेळोवेळी पत्र व्यवहार तसेच विधिमंडळात आवाज उठवला होता त्यांच्या या मागणीची राज्य सरकार ने तात्काळ दखल घेऊन विशेष बैठक बोलावली होती.या मागणीची दखल घेत राज्याचे दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ५ रुपये अनुदान देण्याची घोषणा केली आहे.